Weather Update Maharashtra
Weather Update Maharashtra :- नमस्कार मित्रहो, राज्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अतीमुसळधार स्वरूपाचा पाऊस होताना दिसतोय, सोबतच हवामान विभागाने काही जिल्ह्यांना रेड अलर्ट अतीमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती पण पुनः एकदा पावसाने जोर पकडला असून राज्यात 20 ऑगस्ट पासून बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 24 तासात आणखी काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून आज राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे व नागरिकांना सतर्क राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Weather Update Maharashtra
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोबतच शेतकऱ्यांसह नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
यासोबतच ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.