Naisargik-Apatti-Nuksan-Bharpai |
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वाचा मोठा निर्णय | यापुढे सलग 5 दिवस होणारा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाणार | Naisargik Apatti Nuksan Bharpai
नैसर्गिक आपत्ती
राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा महत्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सतत 5 दिवस होणारा पाऊस नैसर्गिक आपत्ति म्हणून संबोधली जाणार आहे, आणि त्या निकषानुसार शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. ‘Naisargik Apatti Nuksan Bharpai’
नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय ?
पूर्वीच्या नैसर्गिक आपत्तीच्या निकषामध्ये राज्यात एखाद्या ठिकाणी 65 मी. मी. पेक्षा जास्त पाऊस किंवा गारपिट झाली तर आपत्ती समजली जात होती. (Natural Disaster)
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सततचा पाऊस निश्चितीसाठी काही निकष तयार करण्यात आले आहे. यात 5 दिवस सलग किमान 10 मी. मी. पाऊस होणं अपेक्षित आहे. सोबतच त्या संबंधित ठिकाणी सततचा पाऊस पडल्यामुळे नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाईल असं राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. “Naisargik Apatti”
शेतकऱ्यांना मदत करन्याबाबत राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय झाला आहे. 5 दिवस पाऊस पडल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, ज्या पिकांचे नुकसान होऊन ही नुकसान भरपाई मिळत नव्हती अशा पिकांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार असं राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.