IMD-Rain-Alert-In-Maharashtra |
IMD Rain Alert In Maharashtra
राज्यात 25 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीटीचा इशारा , राज्यातील इतक्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मित्रहो, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे पण राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून ऊन पावसाचा लपंडाव सुरू आहे. चालू एप्रिल महिन्यात सुद्धा राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच आहे.IMD Rain Alert
हवामान अंदाज महाराष्ट्र
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात या महिन्याच्या शेवट पर्यन्त वादळी पावसाचा अंदाज आहे. 25 ते 28 एप्रिल पर्यन्त राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसासह गारपिट होण्याचा अंदाज वर्तवीला आहे.‘Panjabrao Dakh Havaman Andaj’
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे ?
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या 25 एप्रिल रोजी वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया,बीड, धाराशिव इ. जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजेच अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी मुसळधार पावसासोबत गारपिट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.पंजाब डख अंदाज
सोबतच धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा इ. जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.“havaman andaj today”
दिनांक 26 एप्रिल रोजी राज्यातील सिंधुदुर्ग जिल्हा वगळता संपूर्ण राज्याला येलो व ऑरेंज अलर्ट दिला आहे. अमरावती, बुलढाणा, वाशिम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, सातारा, पुणे इ. जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन या जिल्ह्यांमध्ये जोरदार गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.