Weather Update | मुंबई, पुण्यासह या 7 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट
Havaman Andaj :- राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे, राज्यात मान्सून साठी पोषक वातावरण असल्याने मुसळधार पाऊस होत असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
या धुमाकूळ घालणाऱ्या पावसामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांचे नुकसान सुद्धा झालेले आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक 28 जुलै रोजी राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.
कुठल्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट ?
यामध्ये मुंबई, पुणे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे