महाराष्ट्रासाठी पुढचे 48 धोक्याचे ; हवामान खात्याचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
राज्यात काल पासून बहुतांश जिल्ह्यात पावसाची संततधार पाहायला मिळत आहे, गेल्या 24 तासात राज्यात विविध ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालेला आहे. सोबतच पावसामुळे नदीनाले ओसाडुंंन वाहायला लागले आहे.IMD Alert
प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यासाठी पुढील 48 तास अतिमहत्वाचे असणार आहे, कारण की पुढील 48 तासामद्धे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे.
19 जुलै 2023
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात दिनांक 19 जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे, या जिल्ह्यात पुढील 24 तासात जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज, येथील नागरिकांनी संभावित धोका लक्ष्यात घेऊन सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.’Panjabrao Dakh Havaman Andaj’
सोबतच नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
तर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.पंजाब डखअंदाज
20 जुलै 2023
20 जुलै रोजी राज्यातील चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देऊन मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, सोबतच नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.“havaman andaj today”