CM Baliraja Scheme 2024
CM Baliraja Scheme 2024 :- नमस्कार शेतकरी मित्रहो, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून, योजनेअंतर्गत या जिल्ह्यातील कृषि पंपधारक शेतकरी ग्राहकांचे विजबिल माफ केले जाणार आहे. तर संदर्भातच या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
जागतिक हवामान बदल आणि अनियमीत पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झाला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
शेतीला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी बहुतांश शेतकरी कृषिपंपाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या कृषिपंपाना महावितरनच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जातो.
CM Baliraja Scheme 2024
कृषिपंपाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना जाहीर करण्यात आली आहे त्यासंदर्भातला शासन निर्णय हा दिनांक 25 जुलै 2024 रोजी राज्य शासनाने जारी केला आहे.
या शासन निर्णयांतर्गत 7.5 अश्वशक्तिपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषिपंपाना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण शासनाने राबविण्यास सुरुवात केली आहे. ही योजना पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच मार्च 2029 पर्यंत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेअंतर्गत एप्रिल ते जून या 3 महिन्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील 7.5 अश्वशक्तीच्या कृषिपंप ग्राहकांचे 46 कोटी रुपये माफ करण्यात येणार आहेत अशी माहिती महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.