Nuksan Bharpai Yadi Maharashtra
Nuksan Bharpai Yadi Maharashtra :- नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे आणि इतर नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी शासन निर्णय (GR) काढण्यात आला आहे.
सदर शासन निर्णय राज्यात सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिके आणि इतर मालमत्तेची नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वाटप करण्यासंदर्भातला शासन निर्णय आहे.
Nuksan Bharpai Yadi Maharashtra
शेतकरी मित्रहो, या संदर्भातला शासन निर्णय दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आला होता त्यामध्ये नुकसान भरपाई देण्यासाठी 106 कोटी 64 लाख 94 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता पण शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2024 रोजी एक शुद्धीपत्रक जाहीर करून 112 कोटी 39 लाख 21 हजार रुपये पर्यंतचा निधी वाढवून Nuksan Bharpai Yadi Maharashtra मान्यता देण्यात आली आहे.
या शासन निर्णयामध्ये सन 2020 ते 2022 या कालावधीमध्ये नुकसान झालेल्या जवळपास 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत म्हणून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.