Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update :- नमस्कार शेतकरी मित्रहो, राज्यातील वातावरणात मोठा बदल घडताना दिसतो आहे कारण बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय असून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
सोबतच राज्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा बसण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. यावेळेस वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज सुद्धा दिलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात दिनांक 30 मार्च 2025 रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update
यासोबतच दिनांक 31 मार्च 2025 रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा होण्याची शक्यता आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, धाराशिव, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा हलक्या वादळी पावसाची शक्यता आहे.
दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हे वगळता संपुर्ण राज्यात जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी संपुर्ण राज्याला वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून यादीवशी वीजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात राहण्याचा अंदाज असून जोरदार वारे वाहण्याचा सुद्धा अंदाज आहे.
👉Jio Recharge Plan 1 Year | जिओचा 1 वर्षाचा प्लान 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार इतर फायदे
👉Namo Shetkari Yojana 6th Installmet | नमो शेतकरी योजनेचा 6 वां हप्ता या तारखेला येणार ! 2000 की 3000 ?