Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल ; या अटी शिथिल व अर्ज मुदतवाढ !

आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
74 / 100 SEO Score

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update :- नमस्कार मित्रहो, सध्या मुंबईत विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मित्रहो योजनेच्या अटी व नियम सोबतच पात्र लाभार्थी संदर्भात एक शासन निर्णय GR काढण्यात आला होता.

पण यामध्ये असलेल्या काही अटींमुळे राज्यातील बऱ्याचशा महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता होती त्यामुळे यामध्ये काही अटी शिथिल करण्याचा निर्णय  राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Update

आमच्या Whatsapp ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now
आमच्या Telegram ग्रुपला जॉईंन व्हा. Join Now

विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यावेळी उपस्थित होते.

योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.

👉Kharif MSP 2024-25 | केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढवले ! पहा कोणत्या पिकाला किती भाव वाढविण्यात आला ते.

अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी 5 एकर शेतीची अट वगळण्याचा, लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्याचा, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार असून योजनेमध्ये सुधारणा केलेल्या निर्णयांचा शासन निर्णय तातडीने जाहिर करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment